अतुल कुलकर्णी सत्ता मिळविण्यासाठी किंवा ती टिकविण्यासाठी राजकारण करावेच लागते.......
अबाऊट मी







– अतुल कुलकर्णी अमर, अकबर, ऍंथोनी चित्रपटात अमिताभ बच्चन, ऋषी......
सचिवांच्या अरेरावीनंतर राज्यभरात डॉक्टरांचा संताप
अतुल कुलकर्णी वृत्तविश्लेषण / लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोना......
अतुल कुलकर्णी बाबूरावांचा फोन वाजला. हातातला पेपर बाजूला करत बाबूरावांनी......
– अतुल कुलकर्णी देवगिरी कॉलनीतल्या त्या घरातले सूर आता पुन्हा......
‘सुदृढ मन सर्वासाठी’ हे ध्येयवाक्य घेऊन ठाण्यात आयपीएच नावाची संस्था......
अतुल कुलकर्णी सत्ता मिळविण्यासाठी किंवा ती टिकविण्यासाठी राजकारण करावेच लागते.......
लेटेस्ट फोटोज्
अतुल कुलकर्णी यांनी मला सत्तेत नसतानाही कार्यक्रमाला बोलावले. ते देखील ज्या घटनेमुळे माझे मंत्रीपद गेले त्याच घटनेवरील पुस्तकाच्या प्रकाशनाला. पुस्तकात देखील त्यानी वस्तूस्थिती मांडताना मला कोठेही माफ केलेले नाही. अभ्यासू वृत्तीने पत्रकारिता करणार्यांचे प्रमाण दिवसेन्दिवस कमी होत असताना अतुल कुलकर्णी यांची पत्रकारिता माझ्या सारख्या राजकारण्यांना कायम महत्वाची वाटत आली आहे. (26/11 ऑपरेशन मुंबई पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगीच्या भाषणातून)
आर आर पाटील
अतुल कुलकर्णी यांचं ‘लोकमत’मधील अधून मधून सदर हे नियमितपणे वाचनात येते असं नाही. पण जेव्हा केव्हा वाचलं जातं तेव्हा ते मनाला भावतं, हृदयाचा ठाव घेतं आणि समाजहितास्तव जागतं असं हे लिखाण सातत्यानं चालू राहिलं पाहिजे असं मला वाटतं. अचूकपणे उणिवा, दोषांवर बोट ठेवून नर्मविनोद शैलीतल्या या लेखनाने माणसांची मनं दु:खी होणार नाहीत पण त्यांच्या विचार व कर्म करण्याच्या पध्दतीत निश्चित बदल होईल, असा विश्वास मला वाटतो. कुलकर्णीनीं लेखणीतून सतत चांगला पहारा ठेवावा.
शरद पवार
अधून मधून हे सदर मला व्यक्तिगत खूप आवडले. त्यामुळे मी लोकमतचे समूह संपादक दिनकर रायकर यांना सांगून हे सदर लोकमत व लोकमत समाचारच्या सर्व आवृत्त्यांना प्रकाशित करण्याच्या सूचना केल्या होत्या. माझा निर्णय अतुलने त्याच्या लिखाणातून योग्य ठरवला याचे मला कौतूक आहे. राजकीय, सामाजिक घटना घडामोडींवर उपहासात्मक व वंगात्मक लिखाण आता कमी होत चालले आहे. अशा काळात अतुलने ही शैली जोपासली आहे. ज्या गोष्टीची बातमी होत नाही पण त्या गोष्टी समोर याव्या वाटतात त्या त्याने या सदराच्या माध्यमातून मांडल्या व लोकांना राजकारण्यांची दुसरी बाजूही दाखविली आहे. सुदैवाने आजचे राजकारण आणि समाजकारण ही दोन्ही क्षेत्रे उपहास आणि व्यंग यांना प्रोत्साहन देणारीच ठरत आहेत. नेत्यांचे वागणे आणि बोलणे यातील अंतर, समाजाची नीतीमुल्ये आणि त्याची प्रत्यक्ष वर्तणूक व आदर्श आणि व्यवहार यात निर्माण होत असलेले अंतर हे सर्व विनोदी व विडंबनकार लेखकांसमोर असलेले चांगले व आमंत्रक आव्हान आहे. अतुलने हे आव्हान आणखी जोरात स्वीकारावे व महाराष्ट्राचे राजकीय, सामाजिक जीवन पारशर्दक होईल यासाठी प्रयत्न करावा.
विजय जे. दर्दा
हे लिखाण खुसखुशीत, नर्मविनोदी आणि व्यंगात्मक असल्याने वाचनीय आणि लोकप्रिय आहे. सामान्य माणसाच्या आयुष्यात असलेली दु:ख आणि वेदना यांना टीकात्मक अथवा विनोदाची फोडणी देऊन आपण एक प्रकारे दांभीक राजकीय मुखवटाच जनतेसमोर आणता. खरे म्हणजे अशा उपहासात्मक लिखाणातून महाराष्ट्रातील नेत्यांनी राजकीय शहाणपणच शिकले पाहिजे. यापुढेही राजकारणातील व्यंगाला आणि ढोंगाला उघडे पाडून आपण असेच लेखन करीत रहावे. जेणेकरुन महाराष्ट्रातील जनतेची सामाजिक आणि सार्वजनिक जीवनातील प्रगल्भता वाढेल.
राज ठाकरे
महाराष्ट्रातील तरुण, अभ्यासू व धडाडीचे पत्रकार अतुल कुलकर्णी यांनी औरंगाबादहून मुंबईला येऊन पत्रकारितेत आपला वेगळा ठसा उमटवला आहे. राज्यातील राजकारण्यांची व या क्षेत्रात घडणार्या अनेक बारीकसारीक घटनांची नोंद घेऊन त्यावर अधूनमधून नावाचे एक खुमासदार व्यंग सदर ते लोकमतमध्ये लिहीत आहेत. यात अनेक नेत्यांच्या गुणदोषांचे परखड विश्लेषण व्यंगात्मक शैलीत त्यांनी सादर केल्याने त्याची लोकप्रियता वाढली आहे. असे व्यंगात्मक लिखाण करताना कधी तोल जाऊन कडवट अर्थ निघणारे लिखाण होईल सांगता येत नाही पण सुदैवाने अतुल यांनी हे लिखाण करताना आपला समतोल भाव कायम राखला हे विशेष. यातील लेख कधीही वाचले तरी परत परत वाचावेसे वाटतात यात शंका नाही.
अभिनंदन थोरात
या सदरातचा उपहासात्मक परिचय तसा आमचा नवा नाही. अधूनमधून आम्ही देखील याचा आस्वाद घेत असतो. राजकीय उपहास त्याचा लहेजा कायम राखून मांडण्याची आपली पध्दत वेगळी आणि चांगली आहे. राजकारण्यांना चिमटे काढण्याचा छंद आपण चांगला जपला आहे. काही वेळेला आपली टीका बोचरी होत असली तरी त्यामुळे राजकारण्यांतील माणुसकी जागावी हा आपला सदहेतू असल्याने त्याबाबत फारसं कोणाला वाईट वाटत नसावे. या सदरातून आपली प्रगल्भता आणि अभ्यास नियमीतपणे दिसतो. जागल्या म्हणून काम करणारा आपला दादासाहेब वाचनाचा मनमुराद आनंद देऊन जातो.
उद्धव ठाकरे
- right-post
- taji batami
- Uncategorized
- News
- Photo Gallery
- Video Gallery
- वैशिष्ट्ये पोस्ट
- Books
- टेस्टिमोनियल
- ब्लॉग
- जनहितयाचिका
- पहिली ते चौथीच्या मुलांना मोफत पुस्तके
- राज्य कामगार विमा रुग्णालयांना जीवदान
- सलीम अली सरोवराविषयी औरंगाबाद खंडपीठाने विशेष समिती नेमली
- औरंगाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालायचे आरोग्य सुधारले…!
- सिडकोतील ग्रीन बेल्ट वाचले… आता मात्र पुन्हा…
- औरंगाबाद जिल्हा बँकेतील गैरव्यवहारांवरील पीआयएल
- मतीमंद मुलांना प्रमाणपत्र देणार कोण? या प्रश्नाचा शोध
- सिडकोतील २६ हजार अतीक्रमणे पाडली गेली !
- आरटीओ कार्यालयातील भोंगळ कारभार
- सार्वजनिक आरोग्य विभागातील औषध खरेदी
- न्यूज सिरीज
- अर्काइव्ह
- Home Page Slider
वैशिष्ट्य पोस्ट
- देवा, आम्ही आता कसेही वागतो, काहीही करतो…!
अतुल कुलकर्णी बाबूरावांचा फोन वाजला. हातातला पेपर बाजूला करत बाबूरावांनी…
- राष्ट्रीय महामार्गासाठीच्या भूसंपादनावर राज्यसरकारचा अक्सिर इलाज
पैशांसाठी जमिनी घेण्याच्या हव्यासाला मुख्यमंत्री, महसूलमंत्र्यांचा चापअतुल कुलकर्णी लोकमत मुंबई : राष्ट्रीय महामार्गासाठी लागणाऱ्या जमिनींना दिला…
- महापालिकांच्या १८२८ शाळा होणार ‘मुंबई पब्लिक स्कूल’
एकच रंगसंगती, आधूनिक साधने, आणि खाजगी शाळांशी स्पर्धाअतुल कुलकर्णी लोकमत मुंबई : मुंबई महापालिकांच्या शाळांची वेगळी ओळख…
- राज्यात विजेची थकबाकी गेली ६३,२६३ कोटीवर
मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी आज बोलावली मॅरेथॉन बैठकअतुल कुलकर्णी लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : २०१४ साली भाजप…