शुक्रवार, १९ एप्रिल २०२४
19 April 2024

दरोड्यांमध्ये महाराष्ट्र देशात सहावा!

मुंबई दि. ९ – दरोड्यामध्ये देशात सहावा, दंगलीमध्ये सातवा तर लैंगीक छळात आठवा क्रमांक महाराष्ट्राने पटकावला आहे! हुंडाबळीत आपण देशात १३ व्या क्रमांकावर आहोत तर भारतातील मोठ्या ३५ शहरांमध्ये घडणाऱ्या गुन्ह्यांमध्ये मुंबईचा २८ वा क्रमांक आला आहे.

राष्ट्रीय अपराध अभिलेख ब्युरो (नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो)ने २०१०ची आकडेवारी प्रकाशित केली आहे. त्यातून ही माहिती समोर आली आहे.

भारतातील प्रमुख ३५ शहरांमध्ये आयपीएस (भादवि)अंतर्गत घडलेल्या गुन्ह्यांपैकी सगळ्यात जास्त गुन्हे दिल्लीत १२.५% आहेत तर त्याखालोखाल मुंबईने ९.२% मिळवत दुसरा नंबर पटकावला आहे.मुंबई शहरात गुन्ह्यांचा दर २०७.३% आहे तर देशाचा सरासरी दर ३४१.९% इतका आहे.

त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणजे अनुसूचित जाती आणि जमातीमधील गुन्ह्यांमध्ये राज्यात लक्षणीय घट झाली आहे. देशातील ३५ प्रमुख शहरांसह विविध राज्यातील सर्व प्रकारच्या गुन्ह्यांची आकडेवारी काढली गेली आहे. विशेष म्हणजे काही गुन्ह्यांमध्ये उत्तरप्रदेश, बिहारने आपला क्रमांक कायम ठेवला असून खुनासारख्या प्रकारात महाराष्ट्र या दोन राज्यांच्या जवळ गेला आहे. विशेष व स्थानिक कायद्यांतर्गत घडलेल्या गुन्ह्यांच्या दरामध्ये उत्तरप्रदेशचा (४६.७ %) क्रमांक पहिला आहे. त्या खालोखाल आंध्रप्रदेश (१३.९%) व तामिळनाडूने (११.४%) घेत तिसरा नंबर मिळवला आहे. या प्रकारात मात्र महाराष्ट्राने आपली स्थिती घसरु दिलेली नाही. यात आपली टेवारी फक्त २.८% आहे.

गुन्हेगारीत टॉप फाईव्ह असलेल्या शहरांमध्ये कोचीने पहिला नंबर मिळवला आहे तर इंदोर, भोपाळ, जयपूर आणि विजयवाडा यांचा ओळीने नंबर लागला आहे. यात मुंबईने मात्र २८ वा नंबर मिळवला आहे.

एनसीआरबी ही शासकीय संस्था असून ती देशात घडणाऱ्या गुन्ह्यांची आकडेवारी संकलीत करुन त्याचे विश्लेषण करते. केवळ गुन्ह्यांची संख्या विचारात न घेता त्या त्या राज्यातील लोकसंख्य हा निकष लावून गुन्ह्यांचा दर ठरवला जातो. हे प्रमाण दर एक लाख लोकसंख्येमागे काढला जातो.

देशात पुरोगामी म्हणवला जाणारा महाराष्ट्र लोकसंख्येच्या तुलनेत दुसऱ्या क्रमांकावर असला तरी गुन्हेगारी क्रमांकात आपला नंबर १८ वा आहे याचे समाधान मानायचे की खूनासारख्या गुन्ह्याच्या संख्येत आपण उत्तरप्रदेश, बिहारनंतर तिसऱ्या नंबरवर आहोत याची चिंता करायची हा खरा सवाल या अहवालाने तयार केला आहे. कारण याच महाराष्ट्रात हुंडाबळीचे प्रमाण ४.७ टक्के आहे. शिवाय मानवी तस्करीत (इम्मॉरल ट्रॅफीकींग) आपले राज्य चौथ्या नंबरवर (१२.२%) आहे.

एनसीआरबीमध्ये महाराष्ट्राचा नंबर

  • खून १९ वा
  • खूनाचा प्रयत्न २०
  • बलात्कार २०
  • अपहरण २३
  • दरोडे
  • दंगली
  • जाळपोळ १०
  • हुंडाबळी १३
  • विनयभंग १४
  • लैंगीक छळ

जबरी गुन्हे

  • उत्तरप्रदेश ११.३%
  • बिहार ९.९%
  • महाराष्ट्र ९.४%
  • बंगाल ८.४%
  • कर्नाटक ६.८%

खूनाची संख्या

  • उत्तरप्रदेश ४४०१
  • बिहार ३३६२
  • महाराष्ट्र २७४४
  • आंध्रप्रदेश २५३८
  • मध्यप्रदेश २४२३

खुनाचा प्रयत्न

  • उत्तरप्रदेश ४००४
  • बिहार २९१५
  • तामिळनाडू २६४१
  • मध्यप्रदेश २२७७
  • आंध्रप्रदेश १९५३

महिलांवरील अत्याचार

  • आंध्रप्रदेश १२.८%
  • बंगाल १२.२%
  • उत्तरप्रदेश ९.४%
  • राजस्थान ८.५%
  • मध्यप्रदेश ७.७%
  • महाराष्ट्र ७.४%

अनुसुचित जाती

  • उत्तरप्रदेश १९.२%
  • राजस्थान १५.२%
  • आंध्रप्रदेश १३.२%
  • बिहार १०.७%
  • मध्यप्रदेश १०.३%
  • महाराष्ट्र ३.५%

अनुसुचित जमाती

  • मध्यप्रदेश २३.५%
  • राजस्थान २२.४%
  • आंध्रप्रदेश १३.७%
  • ओरीसा ९.४%
  • छत्तीसगड ८.६%
  • महाराष्ट्र ५.0%

एक लाख लोकसंख्येमागे प्रमुख शहरातील गुन्हे

  • विशाखापट्टणम् ७०९६.५
  • लखनौ ६६८०.२
  • हैदराबाद ५९९९.८
  • कानपूर ५५६३.८
  • अलाहाबाद ४९४७.९
  • मुंबई २९.१

(हे प्रमाण कमी दिसत आहे कारण मुंबईची व बाकी शहरांची लोकसंख्या यात मोठी तफावत आहे)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *