शुक्रवार, २६ एप्रिल २०२४
26 April 2024

शरद पवार

अतुल कुलकर्णी यांचं ‘लोकमत’मधील अधून मधून सदर हे नियमितपणे वाचनात येते असं नाही. पण जेव्हा केव्हा वाचलं जातं तेव्हा ते मनाला भावतं, हृदयाचा ठाव घेतं आणि समाजहितास्तव जागतं असं हे लिखाण सातत्यानं चालू राहिलं पाहिजे असं मला वाटतं. अचूकपणे उणिवा, दोषांवर बोट ठेवून नर्मविनोद शैलीतल्या या लेखनाने माणसांची मनं दु:खी होणार नाहीत पण त्यांच्या विचार व कर्म करण्याच्या पध्दतीत निश्चित बदल होईल, असा विश्वास मला वाटतो. कुलकर्णीनीं लेखणीतून सतत चांगला पहारा ठेवावा.